आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य घडविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे
प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
परिवर्धित करणेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
२६ नोव्हेंबर १९४९ ला याद्वारे हे संविधान अंगीकृत व
अधिनियमीत करीत आहोत
जय हिंद
भारताचे संविधान ऑडिओ मध्ये ऐका
स्त्रोत – विकिपीडिया